Features

व्यक्तिविशेष

स्वातंत्र्याचा पहिला रणशिंगनाद : छत्रपती शिवाजी महाराज

   भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा विचार करताना इ.स. १८५७ मधील उठावाला “भारतीय स्वातंत्र्यसमराचा श्रीगणेशा” असे संबोधले जाते. अनेक इतिहासकारांनी या उठावाचे महत्त्व अधोरेखित केले असून त्यातील काही व्यक्तिमत्त्वांचे मोठ्या प्रमाणावर गौरवीकरणही केले आहे. तथापि, इतिहासाचा अभ्यास केवळ प्रचलित मतांच्या आधारे न करता, निरपेक्षपणे आणि व्यापक दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे. कारण इतिहास हा …

Read More »

“इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे” : लोकस्मृतीतील बळीराजा

   भारतीय समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक जाणिवांचा अभ्यास करताना बळीराजाचे स्थान समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. विशेषतः शेतकरी, बहुजन आणि श्रमजीवी समाजाच्या दृष्टीकोनातून बळीराजाचा इतिहास आणि त्याच्याभोवती निर्माण झालेल्या परंपरा, कथा आणि प्रतीकांचे पुनर्वाचन करणे आवश्यक आहे. महात्मा जोतिराव फुले यांनी आपल्या लेखनातून आणि सामाजिक विचारातून बळीराजाला विशेष स्थान दिले. …

Read More »

मानवतेचे महान उपासक संत गाडगे महाराज : सेवा, स्वच्छता आणि समाजप्रबोधनाचे युगपुरुष

   ”मनुष्य हा उमललेल्या फुलासारखा असतो. त्याचे जीवन केवळ स्वतःसाठी नसून इतरांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी, त्यांच्या जीवनात आनंद आणि चेतनेचा प्रकाश पसरविण्यासाठी असते.” ही भावना ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याच्या आचरणातून जगासमोर मांडली, ते म्हणजे संत गाडगे महाराज. त्यांनी आपल्या कार्यातून मानवतेची अशी गंगा प्रवाहित केली की, तिचा लाभ केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, …

Read More »

शिक्षणमहर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील : बहुजन शिक्षणक्रांतीचे शिल्पकार

   ”शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे,” या विचाराला आपल्या संपूर्ण आयुष्याचे ध्येय बनवून ग्रामीण, गरीब आणि वंचित समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे शिक्षणमहर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातील एक तेजस्वी पर्व आहेत. त्यांनी केवळ शाळा आणि महाविद्यालये उभी केली नाहीत, तर शिक्षणाला सामाजिक न्याय, स्वाभिमान …

Read More »

समताप्रिय संतशिरोमणी संत नामदेव महाराज : भक्ती, समता आणि सामाजिक प्रबोधनाचे अध्वर्यू

   महाराष्ट्राच्या संतपरंपरेत संतशिरोमणी संत नामदेव महाराज यांचे स्थान अत्यंत मानाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. वारकरी संप्रदायातील हे श्रेष्ठ संत केवळ भक्तिकाव्याचे रचनाकार नव्हते, तर ते समाजप्रबोधन, सामाजिक समता, मानवतावाद आणि लोकधर्माचे प्रभावी पुरस्कर्ते होते. त्यांच्या कार्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उत्तर भारतापर्यंत पोहोचला. विशेषतः पंजाबमधील शीख परंपरेतही संत नामदेव महाराजांना अत्यंत …

Read More »